२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

 २९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

  • दरवर्षी जागतिक व्याघ्र दिन २९ जुलै रोजी साजरा केला जातो.
  • २९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या जागतिक व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
  • वाघ व त्यांच्या नैसर्गिक अधिवास यांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करून त्यांचे महत्त्व जगाला पटवून देणे हा जागतिक व्याघ्र दिनाचा उद्देश आहे.
  • वाघांची संख्या झपाट्याने कमी होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर हा दिवस साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.

भारत आणि व्याघ्र संवर्धन:

  • १९७२ मध्ये भारतात व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली. सध्या भारतात ५० तर महाराष्ट्रात ६ प्रकल्प आहेत.

अखिल भारतीय व्याघ्र गणना २०१८ अहवाल :

  • नरेंद्र मोदी यांनी २९ जुलै २०१९ रोजी देशातील चौथ्या व्याघ्र गणनेचा अहवाल जाहीर केला.
  • या अहवालानुसार २०१८ मध्ये भारतातील वाघांची एकूण संख्या २९६७ वर पोहोचली आहे. २०१४ मध्ये ही संख्या २२२६ होती.
  • मागील चार वर्षांत देशातील वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ झाली आहे.
  • यानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणारी पहिली पाच राज्ये : 
    • मध्य प्रदेश ५२६, कर्नाटक ५२४, उत्तराखंड ४४२, महाराष्ट्र ३१२, तामिळनाडू २६४.
  • भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्यातर्फे देशात दर चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते.
  • पहिली व्याघ्रगणना २००६ मध्ये झाली. २०१८ची ही चौथी घटना आहे.
  • जगात सर्वाधिक वाघांची संख्या भारतात आहे. त्या खालोखाल रशिया, इंडोनेशिया, मलेशिया व नेपाळचा क्रमांक लागतो.

Contact Us

    Enquire Now