सागरी सुरक्षेसाठी मोंदीची पाच तत्त्वे

सागरी सुरक्षेसाठी मोंदीची पाच तत्त्वे

  • समुद्रमार्गाने होणारा व्यापार सुरक्षित आणि वृद्धिंगत होण्यासाठी तो निर्बंधमुक्त करणे आवश्यक आहे असे पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेत अध्यक्षपदावरून बोलताना सांगितले.
  • सुरक्षा समितीचे अध्यक्षपद एक ऑगस्टला भारताकडे झाल्यानंतर सागरी सुरक्षेवर चर्चा करण्यात आली.
  • सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भूषविणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
  • सुरक्षित, संरक्षित आणि स्थिर व्यापारासाठी भारतातर्फे ‘सागर’ हे अभियान राबविले जात आहे. त्यात सर्वांच्या सुरक्षेचा आणि विकासाचा विचार केला आहे.

मोदी यांची सुरक्षा परिषदेतील पाच तत्त्वे

  • सागरी व्यापारातील अडथळा दूर करणे.
  • सागरी वादांचे शांततामय मार्गाने आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निराकारण करणे.
  • अराष्ट्रीय घटकांमुळे असलेले सागरी धोके आणि नैसर्गिक संकटांचा एकत्रितपणे सामना करणे.
  • सागरी पर्यावरण व स्रोतांचे जतन करणे.
  • जबाबदार सागरी संपर्क प्रस्थापित करणे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद

  • मुख्यालय : न्यूयॉर्क
  • सदस्य : १५ यात ५ स्थायी आणि १० अस्थायी
  • स्थायी सदस्य : अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन
  • नुकतेच भारताचे ऑगस्ट २०२१ साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद स्वीकारले.
  • UNSCच्या अस्थायी सदस्य म्हणून २ वर्षांचा कार्यकाळ भारताने जानेवारी २०२१पासून सुरू केला.
  • विशेष : संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान असतील.

Contact Us

    Enquire Now