राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणास सु-मोटू अधिकार

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणास सु-मोटू अधिकार

  • नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय हरित लवादास देशभरातील पर्यावरणीय समस्या हाताळण्यासाठी स्वविवेकाधिकारासह (सू-मोटू) ‘अद्वितीय मंच’ म्हणून घोषित केले आहे.

निर्णयातील ठळक वैशिष्ट्ये

  • एनजीटीची भूमिका केवळ निर्णायक स्वरूपाची नसून निवारक, सुधारात्मक किंवा उपचारात्मक स्वरूपाची आहे.
  • यानुसार ते घटनेच्या कलम २१ अंतर्गत जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण करते.
  • पर्यावरणविषयक समस्यांना हाताळण्यासाठी एनजीटी मूळ तसेच अपिलीय अधिकारक्षेत्राचा वापर करते.
  • जगातील सर्वात प्रगतिशील न्यायाधिकरणांपैकी एक म्हणून एनजीटीला ओळखले जाते.

राष्ट्रीय हरित लवाद (National Green Tribunal : NGT)

  • भोपाळमध्ये १९८४मध्ये युनियन कार्बाइड कंपनीतून झालेल्या वायुगळतीमुळे मोठी जीवितहानी झाली.
  • अशा समस्यांची तड लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी, असा आग्रह सुप्रीम कोर्टाने केला.
  • परिणामी केंद्र सरकारने राष्ट्रीय लवाद कायदा, २०१० मंजूर केला; त्यानुसार राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना १८ ऑक्टोबर, २०१० रोजी करण्यात आली.
  • रचना : किमान १० ते कमाल २० सदस्य
  • अध्यक्ष : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती एनजीटी अक्ष्यक्षाची निवड करतात.
  • कार्यकाल :

अ) अध्यक्ष – जर 

i) सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती- वयाची ७० वर्षे

ii) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती – वयाची ६७ वर्षे

ब) सदस्य : ६५ वर्षे वयोमर्यादा

  • खंडपीठे

१) प्रमुख खंडपीठ – दिल्ली

२) पश्चिम विभाग – पुणे

३) केंद्रीय विभाग – भोपाळ

४) दक्षिण विभाग – चेन्नई

५) पूर्व विभाग – कोलकाता

  • अधिकारक्षेत्र : पर्यावरणविषयक प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, यासाठी एनजीटीने सहा महिन्यांत अर्ज अथवा अपील निकाली काढावा, अशी अपेक्षा आहे.
  • एनजीटीच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात ९० दिवसांत अपील करणे बंधनकारक आहे.
  • एनजीटीला प्रकरणे बनावट वाटल्यास दंड ठोठावण्याचा अधिकार आहे.

शिक्षा :

१) एनजीटीच्या आदेशांचे पालन न केल्यास शिक्षा ३ वर्षापर्यंत शिक्षा अथवा १० कोटी रुपयांपर्यंत दंड
२) उल्लंघन सुरूच राहिल्यास २५ हजार रुपये दंड
३) एखाद्या कंपनीकडून आदेशाचे उल्लंघन २५ कोटी रुपयांपर्यंत दंड
४)  कंपनीद्वारा उल्लंघन सुरूच राहिल्यास प्रति दिवस १ लाख रुपये दंड

एनजीटी अधिकारक्षेत्रात येणारे पर्यावरणविषयक दिवाणी दावे :

१) जल प्रदूषण कायदा, १९७४

२) वन संवर्धन कायदा, १९८०

३) वायू प्रदूषण कायदा, १९८१

४) पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६

५) सार्वजनिक दायित्व विमा कायदा, १९९१

६) जैविक विविधता कायदा, २००२

  • विशेष पर्यावरणविषयक न्यायाधिकरण स्थापन करणारा ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडनंतर भारत तिसरा देश आहे.

Contact Us

    Enquire Now