राज्याचा वात्सल्य उपक्रम निराधार बालक व विधवा स्त्रियांसाठी
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी आणि विधवा झालेल्या महिलांसाठी अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘वात्सल्य’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
- त्याच धर्तीवर निराधार मुले आणि महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालणारा ‘वात्सल्य’ हा उपक्रम सरकारतर्फे राबविण्यात येणार आहे.
- कोरोनामुळे 14 हजार बालकांनी वडील गमावले तर 20 हजार महिला पतीच्या मृत्यूमुळे निराधार झाल्याचा सामाजिक संस्थांचा अंदाज आहे.
- पालक गमावलेल्या बालकाबरोबरच विधवा झालेल्या महिलांच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत.
- या महिलांना कुटुंबातून व वारसा हक्कातून बेदखल करण्याच्या घटना समोर येत आहेत.
- या महिलांना संजय गांधी निराधार योजना तसेच अन्य योजनांचा लाभ मिळेल या दृष्टीने अनाथ बालकांसाठी राबवण्यात येत असलेल्या वात्सल्य उपक्रमामध्ये यांचा समावेश करण्यात येईल.
- निराधार महिलांसाठी रोजगारनिर्मिती तसेच दैनंदिन बाबींसाठी लागणारी मदत देण्याच्या दृष्टीकोनातून काम केले जाईल, राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.