मिशन सागर अंतर्गत भारतामार्फत मोझँबिक सरकारला ५०० टन अन्न मदत

मिशन सागर अंतर्गत भारतामार्फत मोझँबिक सरकारला ५०० टन अन्न मदत

  • भारताने २५ डिसेंबर २०२१ रोजी ५०० टन अन्नाची मदत मोझँबिक सरकारला दिली.
  • भारतीय नौदलाच्या केसरी या जहाजाद्वारे ही मदत पुरविण्यात आली.
  • मिशन सागर अंतर्गत भारताची ही मदत करण्याची आठवी वेळ आहे.

काय आहे मिशन सागर (SAGAR)?

  • मिशन सागर (SAGAR-Security and Growth for All in the region)
  • सुरुवात – १० मे २०२० (व्हिजन सागरचा एक भाग)
  • उद्देश – कोविड १९ महामारी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी हिंदी महासागरातील देशांना मदत करणे.
  • देश – मालदीव, मॉरिशस, मादागास्कर, कोनारोस आणि सेशेल्स

महत्त्वाचे 

  • मिशन SAGAR हे भारताच्या महत्त्वाकांक्षी व्हिजन सागरचा एक भाग आहे.
  • हिंदी महासागरातील बेटांचे सामरिक आणि आर्थिक महत्त्व विचारात घेता भारताने २०१५ मध्ये व्हिजन सागर मोहिमेला सुरुवात केली.

व्हिजन सागर – २०१५

  • याद्वारे भारत आपल्या सागरी शेजाऱ्यांशी आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य वाढविण्यासाठी मदत करतो.
  • अॅक्ट ईस्ट पॉलिसी, प्रोजेक्ट सागरमाला, प्रोजेक्ट मौसम, यांसारख्या सागरच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांतून भारत आपले हिंदी महासागरातील देशांबरोबर अनुकूल संबंध बनवत आहे.

Contact Us

    Enquire Now