प्रधानमंत्री जनऔषधी योजना
- या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्येच प्रधानमंत्री भारतीय जनऔषधि परियोजनेअंतर्गत ८३०० केंद्र स्थापनेचे उद्दिष्ट साध्य झाले आहे
- सुरुवात – नोव्हेंबर २००८
- दर्जेदार व स्वस्त जेनेरिक औषधी प्रत्येकापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
- २५ नोव्हेंबर २००८ ला अमृतसर येथे पहिले जनऔषधालय सुरू करण्यात आले.
- ही योजना केंद्रीय रसायने व खत मंत्रालयाच्या औषधी विभाग आणि सर्व केंद्रिय औषधी सार्वजनिक क्षेत्र उद्योग यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविली जाते.
- या योजनेमुळे लोकांची औषधी खरेदी करताना सुमारे ५०% बचत होऊ लागली आहे.
- देशातील सर्व जिल्हे या योजनेच्या अंतर्गत आले आहेत.
- जनऔषधालय जो सुरू करतो त्याला MRP वर १६% ते २०% नफा मिळतो.
- औषधालय उघडल्यानंतर पहिली १२ महिने मासिक विक्रीच्या १०% रक्कम (कमाल १०,००० रुपये) प्रोत्साहन म्हणून दिली जाते.
- ५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत जनऔषधी केंद्रांची संख्या ८३५५ झाली आहे.
नविन लक्ष्य :
- सरकारने मार्च २०२४ पर्यंत जनौषधी केंद्रांची संख्या १०,००० पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.