पीएम किसान योजनेअंतर्गत १९,५०० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात

पीएम किसान योजनेअंतर्गत १९,५०० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात

  • प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत ९.७५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार ५०० कोटी रुपये आभासी पद्धतीने हस्तांतरित केले.
  • केंद्र सरकारने पीएम – किसान योजनेंतर्गत आतापर्यंत नऊ हप्त्यांमध्ये १.५७ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत केले आहे.
  • पात्र लाभार्थींना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशा पद्धतीने तीन हप्त्यामध्ये वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत केला जातो.

प्रधानमंत्री किसान योजना

  • १००% केंद्र पुरस्कृत योजना
  • सुरुवात : २४ फेब्रुवारी २०१९ (गोरखपूर, ०३ प्रदेश)
  • लाभार्थींची संख्या : १५ कोटी कुटुंब
  • आर्थिक मदत : दरवर्षी ६००० रुपये (प्रतिमाह – ५००)
  • ही रक्कम २ हजार रुपयांच्या ३ हप्त्यांमध्ये थेट नाम हस्तांतरणाद्वारे
  • महाराष्ट्रात १ डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात आली.
  • यापूर्वी या योजनेंतर्गत २ हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या लहान शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हायचा, पण आता २ हेक्टर पेक्षा कमी जमीन ही मर्यादा हटवल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरली आहेत.

Contact Us

    Enquire Now