छत्तीसगडच्या चौथ्या व्याघ्र प्रकल्पास मंजुरी
- छत्तीसगडमधील चौथ्या व्याघ्र प्रकल्पास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
- छत्तीसगडमधील तमोर पिंगला वन्यजीव अभयारण्य आणि गुरू गोविंदास राष्ट्रीय उदयानाच्या संयुक्त क्षेत्राचा या व्याघ्र प्रकल्पात समावेश होणार आहे.
- या प्रकल्पामुळे भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या एकूण ५३ इतकी झाली आहे.
- वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ३८ V (१) नुसार राज्य शासन, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सुचनेनुसार व्याघ्र प्रकल्प व त्याचे क्षेत्रफळ जाहिर करते.
नवीन व्याघ्र प्रकल्प
- हा नवीन व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि झारखंड या तिनही राज्यांच्या सीमेस लागून आहे.
- छत्तीसगडमधील उदंती सोतानदी, इंद्रावती, अमरकंटक अचानकमार व्याघ्र प्रकल्पांनंतर हा चौथ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे.
- या प्रकल्पामुळे मध्यप्रदेश आणि झारखंडमधील वाघांना कॉरिडॉर प्राप्त होणार आहे.
राष्ट्रीय व्याघ्रगणना, २०१८
- राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण यांच्यामार्फत दर चार वर्षांनी राष्ट्रीय स्तरावर व्याघ्र गणना करण्यात येते. ‘भारतातील वाघांची स्थिती – २०१८’ अहवालानुसार भारतातील वाघांच्या संख्येत ७४१ ने वाढ होऊन २९६७ इतकी झाली आहे.
- २०१४ साली वाघांची संख्या २२२६ इतकी होती.
- मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक ५२६ तर कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये अनुक्रमे ५२४, ४४२ वाघ आहेत.
- महाराष्ट्राने ३१२ संख्येसह चौथे स्थान पटकावले (२०१४ साली-१९० वाघ)
- या अहवालानुसार बक्सा (BU×a) – पश्चिम बंगाल, पलामाऊ (झारखंड) आणि डंपा (मिझोराम) येथील व्याघ्र प्रकल्पांत एकही वाघ आढळून आला नाही.
- महाराष्ट्रात सध्या (सहा राष्ट्रीय उदयाने, ४९ अभयारण्ये, आणि सात संवर्धित राखीव क्षेत्र आहे. (आर्थिक पाहणी २०२०-२१)
जागतिक व्याघ्र दिन
- २०१० साली रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे १३ राष्ट्रांची व्याघ्र परिषद भरविण्यात आली होती. यात २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- त्याचवर्षापासून २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जाते.
- २०२१ ची संकल्पना = त्यांचे अस्तित्व आपल्या हातात.