G – ३३ गट
- स्थापना – २००३ (कॅनकुन मंत्रीपरिषदेपूर्वी)
- सदस्य – ४८ देश
- उद्देश – भारत, ब्राझिल, दक्षिण आफ्रिका यांच्यासह ४८ विकसनशील देशांचा सहभाग असणाऱ्या या गटाची स्थापना कृषी व्यापार वाटाघटींमध्ये विकसनशील देशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी करण्यात आली आहे.
- विकसनशील राष्ट्रे आपल्या देशातील कृषिमालाला संरक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारात काही बंधने घालतात, मात्र WTO ला ही बंधने मान्य नाहीत. या बंधनांच्या वाटाघाटीसाठी हा गट विकसनशील राष्ट्रांचे नेतृत्व करतो.