महिलांवरील गुन्ह्यांबाबत राज्य सरकारचे कायदे कठोर

महिलांवरील गुन्ह्यांबाबत राज्य सरकारचे कायदे कठोर

  • ॲसिडहल्ला किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असलेला कायदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
  • महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती’ हा नवीन कायदा निर्माण करण्यात आला असून विधेयक हिवाळी अधिवेशनात मोडण्यात येणार आहे.

शक्ती कायद्याबद्दल

  1. समाजमाध्यमांतून महिलांची बदनामी करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे हाही गुन्हा ठरवण्यात आला आहे.
  2. तसेच बलात्कार, विनयभंग, ॲसिडहल्ला याबाबत खोटी तक्रार करणे, पोलिसांना सहकार्य न करणे हेही गुन्हेच ठरवण्यात आले आहेत.
  3. सामूहिक बलात्कार करून हत्या केल्यास/मृत्यू झाल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
  4. बलात्कारपीडित, विनयभंग, ॲसिडहल्ला झालेल्यांची नावे उघड करण्यास बंदी व ते भंग करणाऱ्यास २ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
  5. ओळखीच्या व्यक्तीनेच बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप व दंडाची शिक्षा
  6. १६ वर्षांखालील मुलीवर बलात्कारासाठी मरेपर्यंत जन्मठेप.
  7. सामूहिक बलात्कार प्रकरणी २० वर्षांपर्यंत कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप व १० लाख रु. दंड किंवा मृत्युदंड

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now