
नऊ महिन्यांनंतर भारत व चीन लष्करी तणावास पूर्णविराम
- नऊ महिन्यांपासून चाललेल्या पूर्व लडाख सीमेवरील लष्करी तणाव निवळण्याचे संकेत दिसत आहेत.
- पूर्व लडाखमधील पँगॉग सरोवराच्या दक्षिण व उत्तर काठावरील दोन्ही देशांच्या सैन्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे.
- अशी माहिती चीनचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल पु क्वियान यांनी भारत व चीन यांच्यात झालेल्या कॉर्स्प कमांडर स्तरावरील चर्चेत सांगितले.
- पण भारताने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
- पूर्व लडाखमधील पँगॉग सरोवर परिसरात दोन्ही देशाचे सैन्य आमने-यामने व त्यांच्यात जून दरम्यान गलवान खोऱ्यात संघर्ष झाला.
- भारताचे जवान शहीद झाले व चीनचीही मनुष्यहानी झाली.
- या अगोदर दोन्ही देशांदरम्यान लष्करी व राजनैतिक स्तरावर चर्चा झाल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
- २४ जानेवारीला माल्दो चुशुल सीमेवर कॉर्स्प कमांडर स्तरावरील चर्चेत सैन्यमाघारीबाबत मतैक्य झाले.