अनाथ मुलांच्या संगोपनासाठी राज्य सरकारची पाच लाखांची मुदत ठेव

अनाथ मुलांच्या संगोपनासाठी राज्य सरकारची पाच लाखांची मुदत ठेव

  • कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना आधार देण्यासाठी ते सक्षम होईपर्यंत त्यांच्या संगोपनासाठी पाच लाख रुपये मुदत ठेव ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • अशा प्रकारच्या योजनेची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. 
  • राज्यातील 5172 बालकांनी 1, तर 162 मुलांचे दोन्ही पालक कोरोनामुळे दगावले आहेत.

लाभार्थी 

  • 1 मार्च, 2020 रोजी व त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक मृत्यू पावल्यास किंवा
  • एका पालकाचा कोरोनामुळे आणि दुसऱ्याचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास तसेच
  • एका पालकाचा मृत्यू 1 मार्च 2020 पूर्वी आणि त्यानंतर एका पालकाचा कोविडमुळे मृत्यू.
  • वयाच्या 18व्या वर्षापर्यंतच्या मुलांना या योजनेचा लाभ.

व्याजासह रक्कम 

  • संबंधित बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे.
  • मूळ रक्कम व त्यावरील 21व्या वर्षी देय असणारे व्याज मिळवण्यासाठी मुलगी 18 वर्षे तर मुलगा 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक.
  • बालविवाह रोखण्यासाठी वरील अट अंतर्भूत केली आहे.

रक्कम कोणाच्या खात्यावर असेल?

  • बालकाचे संगोपन करण्यास नातेवाईक इच्छुक असल्यास त्यास महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेतून अनुदान.
  • तसेच बालकाच्या नावावरील पाच लाख रुपये मुदत ठेव ही बालक व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या संयुक्त खात्यावर राहील.
  • मात्र बालकाच्या संगोपनास कोणी नातेवाईक इच्छुक नसल्यास त्याच्या खात्यावर एकरकमी पाच लाख रुपये ठेवून त्याला बालगृहात दाखल करण्यात येईल.

लाभाची जबाबदारी

जिल्हा व बालविकास अधिकारी

  • हे कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांची कागदपत्रे कृतिदलासमोर सादर करून त्यांना लाभ मिळवून देणे.

कृती दल 

  • सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीच्या (जे जे कमिटी) निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना.

जबाबदारी 

  • अनाथ बालकांबाबतची माहिती संकलित करणे,  त्यांना संरक्षण देणे व ती मानवी तस्करीस बळी पडणार नाहीत, याची काळजी घेणे.
  • बालकांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्कांचे उल्लंघन होणार नाही व ते अबाधित राहतील याची दक्षता घेणे.

Contact Us

    Enquire Now