संयुक्त राष्ट्र जनरल असेंब्लीच्या ‘गरिबी निर्मूलनासाठी युती’चा भारत संस्थापक सदस्य
- संयुक्त राष्ट्र जनरल असेंब्लीच्या (UNGA) ७४ व्या सत्राचे अध्यक्ष तिज्जनी-मुहम्मद-बंडे यांनी सुरू केलेल्या ‘गरिबी निर्मूलनासाठी युती’चा भारत हा आघाडीचा संस्थापक सदस्य बनला आहे.
- कोविड-१९ यासाठीचा रोगानंतर जागतिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने युती केलेली आहे.
- यामध्ये दारिद्य्र संपवणे केवळ हाच उद्देश नसून त्यासोबत गुणवत्तेचे शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणी व घर आणि सामाजिक सुरक्षा यावरही भारताने भर दिला आहे.
- यासोबतच दारिद्य्र कमी करण्यासाठी कृषी आधुनिकीकरण व रोजगारनिर्मिती यावरही युतीने भर दिला आहे.
- अंदाजे २.१ अब्ज लोक जगभरात गरीब म्हणून वर्गीकृत होत आहेत.
- त्यापैकी ७६७ दशलक्ष अत्यंत गरीब म्हणून जीवन जगत आहेत.
- संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमानुसार २००६ ते २०१६ या कालावधीत २७१ दशलक्षांहून अधिक लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत.
संयुक्त राष्ट्रांबद्दल :
- स्थापना : २४ ऑक्टोबर १९४५
- मुख्यालय : न्यूयॉर्क, संयुक्त राष्ट्र