1983 च्या विश्वविजेतेपदाचे शिलेदार यशपाल शर्मा कालवश

1983 च्या विश्वविजेतेपदाचे शिलेदार यशपाल शर्मा कालवश

जन्म – 11 ऑगस्ट, 1954

मृत्यू – 13 जुलै, 2021

  • 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या पहिल्या विश्वविजेतेपदाचे शिलेदार आणि मधल्या फळीतील निर्भीड फलंदाज यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
  • निर्भीड वृत्ती हे त्यांच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य होते.
  • रणजी क्रिकेटमध्ये यशपाल यांनी पंजाब, हरियाणा आणि रेल्वे या तीन संघांचे प्रतिनिधित्व केले.
  • त्यात त्यांनी एकूण 160 सामन्यांत 8933 धावा केल्या. यांमध्ये 21 शतकांचा समावेश असून 201 नाबाद ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.
  • काही महिला एकदिवसीय सामन्यांत पंच म्हणून यशपाल यांनी जबाबदारी सांभाळली.
  • उत्तर प्रदेश रणजी संघाचे प्रशिक्षकपदही त्यांनी भूषविले.
  • यशपाल यांनी 2000 मध्ये बीसीसीआयच्या निवड समिती सदस्यत्वाची जबाबदारी सांभाळली.
  • याच समितीने 2004 मध्ये महेंद्रसिंह धोनीला प्रथमच संधी दिली होती.
  • 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या भारतीय संघाची निवड करणाऱ्या निवड समितीतही त्यांचा समावेश होता.
  • तसेच, यशपाल यांनी दूरचित्रवाणीसाठी विश्लेषकाची भूमिकाही निभावली.

यशपाल यांचे आंतरराष्ट्रीय करिअर

  • भारताकडून यशपाल शर्मा यांनी 37 कसोटी सामन्यांमध्ये 1606 धावा केल्या आहेत.
  • यात 140 धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 42 सामन्यांत 28.48 च्या सरासरीने 883 धावा केल्या.
  • दोन्ही प्रकारांत त्यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला होता.

Contact Us

    Enquire Now