प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
सुरुवात : १५ जुलै २०१५ रोजी सुरू करण्यात आलेल्या कौशल्य भारत मिशन अंतर्गत ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
उद्देश : कमी शिक्षण घेतलेल्या किंवा मधूनच औपचारिक शिक्षण सोडलेल्यांना एकत्रित करून त्यांचे कौशल्य वाढवून पात्रतेनुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.
- २०२२ पर्यंत देशातील सुमारे ४०.२ कोटी लोकांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे.
- या योजनेद्वारे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळण्याचीही सुविधा आहे.
- फेब्रुवारी २०२१ मध्ये या योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे.
कौशल्य विकासासंबंधित इतर योजना
१) | संकल्प (Skill Acquisition and Knowledge Awareness for Livelihood) | २०१८ |
२) | स्ट्राइव्ह (Skills Strengthening for Industrial Value Enhancement) | २०१९ |
३) | श्रेयस (Scheme for Higher Education Youth in Apprenticeship and Skills) | २०१९ |
४) | उडान (जम्मू काश्मीरमधील युवकांसाठी) | २०११-१२ |
५) | राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद | २००८ |
६) | हुनर से रोजगार तक | २००९ |
७) | महाराष्ट्र ज्ञान मंडळाचा वेव्ह कार्यक्रम | २००२ |