टोलनाक्यांवर १०० मीटर्सपेक्षा मोठी रांग असल्यास ‘टोलमुक्ती’

टोलनाक्यांवर १०० मीटर्सपेक्षा मोठी रांग असल्यास ‘टोलमुक्ती’

  • राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर होणाऱ्या कोंडीतून वाहन चालकांची सुटका होण्यासाठी प्राधिकरणाने नवीन उपाय केला आहे.
  • टोल नाक्यांवर १०० मीटर्सपेक्षा अधिक अंतरावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या असतील, तर टोल न आकारताच वाहनांना पुढे पाठवण्यात येणार आहे.
  • याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील टोलनाक्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी टोल नाक्यांवर १०० मीटर्सपर्यंत पिवळी रेषा आखली जाणार आहे.
  • जोपर्यंत वाहनांची रांग १०० मीटर्सपेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत त्या चालकांकडून टोल घेतला जाणार नाही, असे मार्गदर्शक तत्त्वात नमूद आहे.
  • राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आल्यानंतर टोलची रक्कम ऑनलाइनच घेतली जाते. फास्टॅगमार्फत टोल घेताना प्रवाशांचा झटपट प्रवास होईल, अशी आशा प्राधिकरणाला होती.
  • परंतु काही टोलनाक्यांवर टोल घेताना तांत्रिक कारणास्तव बराच वेळ जातो. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.

Contact Us

    Enquire Now