कसोटी सामन्यातील विजयाला ५० वर्षे पूर्ण

कसोटी सामन्यातील विजयाला ५० वर्षे पूर्ण

  • १९७१ मध्ये भारताने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजला त्यांच्यात भूमीवर १.० ने पराभूत करून भारतीय संघाने विजय मिळविला.
  • १९७१ ह्या वर्षी मिळवलेला विजय भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला.
  • १९ एप्रिल १९७१ या दिवशी कॅरेबियन भूमीवरील भारताच्या ऐतिहासिक पराक्रमाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
  • अजित वाडेकर यांच्याकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपविली तर उपकर्णधारपद श्रीनिवास वेंकटराघवन यांच्याकडे सोपवले.
  • सुनिल गावस्कर नामक ध्रुवताऱ्याचा उदयही याच मालिकेत झाला.
  • सुनिल गावस्करने मालिकेत तीन शतके आणि एक द्विशतकासह सर्वाधिक ७७४ धावा काढल्या होत्या.
  • दिलीप सरदेसाई यांचेही या मालिकेत महत्त्वाचे योगदान होते.
  • दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे झाला. याच सामन्यात भारताने पहिला कसोटी विजय मिळविला.
  • याच विजयामुळे भारताला मालिकेवर प्रभुत्व मिळविता आले.

भारताकडून सर्वाधिक धावा

  • सुनिल गावस्कर – ७७४
  • दिलीप सरदेसाई – ६४२
  • एकनाथ सोलकर – २२४

भारताकडून सर्वाधिक बळी

  • एस. वेंकटराघवन – २२
  • विशनसिंग बेदी – १५
  • ईशपल्ली प्रसन्न – ११

Contact Us

    Enquire Now