
भारतीय सैन्याला संयुक्त राष्ट्रांचे पदक
- दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मिशनमध्ये काम करणाऱ्या भारतीय सैन्याच्या एकूण ८३६ सैनिकांना त्यांच्या सेवांसाठी संयुक्त राष्ट्र पदक देण्यात आले. (ऑक्टोबर २०२१)
- शांतीसेने अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या सैनिकांना अशांत भागात नागरिक, पोलिस, लष्करी कर्मचारी यांच्या संरक्षणाचे तसेच मानवतावादी मदत वितरणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करावे लागते.
शांतीसेना
- स्थापना = १९४५ (संयुक्त राष्ट्रांतर्गत)
- शांतीसेना दिवस = २९ मे
- ‘ब्लू हेल्मेट’ असाही उल्लेख.
- संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमध्ये स्वत:चे सैन्यदल उभारण्याची तरतूद आहे, मात्र असे कोणतेही सैन्यदल उद्याप उभारले नाही. त्यामुळे आपली सर्व शांतता अभियान साध्य करण्यासाठी शांतीसेनेची मदत घेतली जाते.
- रचना – शांतीसेनेच्या स्वयंसेवकाने वयाची २५ वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही. सदस्य राष्ट्राला शांतता करार केल्यानंतर शांतीसेनेचा सदस्य होता येते.
- भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या राष्ट्रांना आतापर्यंत सर्वाधिक योगदान दिले आहे.
वित्तपुरवठा
- शांतीसेनेला देण्यात येणारा वित्तपुरवठा ही सर्व सदस्य राष्ट्रांची संयुक्त जबाबदारी आहे.
- प्रत्येक राष्ट्र संबंधित वाटा देण्यास कायदेशीर बंधनकारक आहे. यामध्ये सुत्रानुसार प्रत्येक राष्ट्राला आपला वाटा द्यावा लागतो.