
प्रोजेक्ट बोल्ड ( BOLD )
- नुकतेच ४ जुलैला खादी व ग्रामोद्योग आयोगाने ( Khadi & Village Industries Commission -KVIC ) राजस्थान मधील वाळवंटीकरण रोखण्यासाठी बोल्ड ( BOLD –Bamboo Oasis on Lands in Drought ) हा प्रकल्प सुरू केला.
- सदर प्रकल्प KVIC च्या ‘खादी बांबू महोत्सव’ अंतर्गत भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (७५ वर्षे ) साजरा करण्यासाठी सुरू केला गेला आहे.
- या प्रकल्पांतर्गत KVIC ने राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील नीचलामांडवा या गावामध्ये ४ जुलैला एकाच दिवसात एकूण पाच हजार बांबूची लागवड करून जागतिक विक्रम नोंदवला.
- या प्रकल्पाच्या माध्यमातून वाळवंटामध्ये हिरवळीचा प्रदेश निर्माण करणे, ग्रामीण उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे तसेच तेथील लोकांचे राहणीमान सुधारणे हा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न KVIC चा आहे
- बांबू ही अतिशय लवकर येणारी गवत वर्गीय वनस्पती असून त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ते अवर्षणग्रस्त भागांमध्ये विशिष्ट महत्त्वाचे आहे. ४ जुलैला आसाममधील बांबूच्या BambusaTulda and Bambusa Polymorpha या प्रजातींची लागवड करण्यात आली होती.
- आर्थिकदृष्ट्या बांबूपासून फर्निचर, अगरबत्त्या, संगीत उपकरणे ( बासरी वगैरे) तसेच कागद आणि इतर हस्तकलेच्या वस्तू बनवता येतात. शिवाय इंधन म्हणूनसुद्धा त्या पासून कोळसा वगैरे मिळतो.
- २७ जुलैला KVIC ने BSF च्या मदतीने जैसलमेर जवळील तानोत (Tanot ) गावामध्ये १००० रोपट्यांची लागवड केली.
- KVIC ऑगस्ट २०२१ च्या अगोदर १५००० बांबूचे रोपटे पेरणार आहे. त्यासाठी गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील ढोलेरा व लेह-लद्दाख या प्रदेशाची निवड केली आहे.